केदारनाथ मंदिर - एक न उलगडलेल कोडं
केदारनाथ मंदीराचे निर्माण कोणी केलं याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात. अगदी पांडवांपासून ते आद्य शंकराचार्य पर्यंत. पण आपल्याला त्यात जायच नाही.
केदारनाथ मंदिर हे साधारण ८ व्या शतकात बांधलं गेलं असावं असे आजचं विज्ञान सांगत. म्हणजे नाही म्हटलं तरी हे मंदिर कमीतकमी १२०० वर्षांपासून अस्तित्वात आहे.
केदारनाथ जिकडे आहे तो भूभाग अत्यंत प्रतिकूल असा आज २१ व्या शतकातही आहे. एका बाजूला २२,०००
फूट उंचीचा केदारनाथ डोंगर, दुसऱ्या बाजूला २१,६००
फूट उंचीचा करचकुंड तर तिसऱ्या बाजूला २२,७००
फुटाचा भरतकुंड. अशा तीन पर्वतातून वाहणाऱ्या ५ नद्या
मंदाकिनी, मधुगंगा, चीरगंगा, सरस्वती आणि स्वरंदरी.
ह्यातील काही ह्या पुराणात लिहिलेल्या आहेत.ह्या क्षेत्रात फक्त "मंदाकिनी नदीच" राज्य आहे. थंडीच्या
दिवसात प्रचंड बर्फ तर पावसाळ्यात प्रचंड वेगाने
वाहणार पाणी. अशा प्रचंड प्रतिकूल असणाऱ्या जागेत
एक कलाकृती साकारायची म्हणजे किती खोलवर
अभ्यास केला गेला असेल."केदारनाथ मंदिर" ज्या ठिकाणी आज उभे आहे तिकडे
आजही आपण वाहनाने जाऊ शकत नाही. अशा ठिकाणी त्याचं निर्माण कां केल गेलं असावं ? त्याशिवाय
१००-२०० नाही तर तब्बल १००० वर्षापेक्षा जास्ती काळ
इतक्या प्रतिकूल परिस्थितीत मंदिर कसं उभं राहील
असेल ? हा विचार आपण प्रत्येकाने एकदा तरी करावा.
जर पृथ्वीवर हे मंदिर साधारण १० व्या शतकात होतं तर
पृथ्वीवरच्या एका छोट्या "Ice Age" कालखंडाला हे
मंदिर सामोरं गेलं असेल असा अंदाज वैज्ञानिकांनी बांधला.साधारण १३०० ते १७०० ह्या काळात प्रचंड हिमवृष्टी
पृथ्वीवर झाली होती व हे मंदिर ज्या ठिकाणी आहे तिकडे
नक्कीच हे बर्फात पूर्णतः गाडलं गेलं असावं व त्याची
शहानिशा करण्यासाठी "वाडिया इंस्टीट्युट ऑफ जीओलोजी डेहराडून" ने केदारनाथ मंदिरांच्या दगडांवर "लिग्नोम्याटीक डेटिंग" हि टेस्ट केली. लिग्नोम्याटीक डेटिंग टेस्ट हे "दगडांच आयुष्य" ओळखण्यासाठी केली जाते. ह्या टेस्टमध्ये अस स्पष्ट दिसून आलं कि साधारण १४ व्या शतकापासून ते १७ व्या शतकाच्या अर्ध्यापर्यंत हे मंदिर पूर्णतः बर्फात गाडलं गेलं होत. तरीसुद्धा कोणतीही इजा मंदिराच्या बांधकामाला झालेली नाही.